छपाईला जाण्यापूर्वी शेवटचा पुन्हा एकदा वाचावा म्हणून " गायतोंडे " ग्रंथ कितव्यांदा वाचला कुणास ठाऊक पण तरी जाताजाता चारदोन चुका मिळाल्याच शुद्ध लेखनाच्या. आता मात्र त्यात तशा चुका मिळणार नाहीत हेमी खात्रीने सांगू शकतो. माझ्या दृष्टीने सांगायचे तर या ग्रंथात सारेच्या सारे काही जमून आले आहे. जरी तो एका चित्रकारावरचा ग्रंथ असला तरी ' गायतोंडे ' यांच्या उतुंग व्यक्तिमत्वामुळे त्या ग्रंथाला वेगळंच चौफेर परिमाण लाभलं आहे.
आता उदाहरणार्थच पहा, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या साऱ्याच घटना या ग्रंथात संकलीत झाल्या आहेत पण त्या करताना गायतोंडे यांची चित्रकलेची भूमिका, त्या मागचं त्याचं तत्वज्ञान, जगण्यातलं तत्वज्ञान, त्यांचा वैचारिक प्रवास, त्यांच्यावर असलेला इतरांचा प्रभाव, त्यांचं आयुष्याविषयीचं तत्वज्ञान, त्यांचे नानाविध अनुभव या सार्यांचच संकलन या ग्रंथात होणं अपेक्षित होतं, जे ' गायतोंडे ' समजावून घेण्यासाठी वाचकांना, त्यांच्या चाहत्यांना, चित्रकलेच्या विद्यार्थ्यांना आणि कलेच्या अभ्यासकांना उपयोगी ठरावं . सांगावयास आनंद वाटतो की ते सारे जमवून आणण्यात आम्ही बरेचसे यशस्वी देखील ठरलो आहोत. तसं नसतं तर मला देखील हा ग्रंथ कामाचा भाग असला तरी इतक्यांदा वाचवला नसता, हे मोकळेपणाने कबूल करावयास मला संकोच वाटत नाही. अर्थात याचे सारे श्रेय अर्थातच गायतोंडे यांनाच आहे. तसेच जे या ग्रंथाच्या लेखन प्रकियेत सहभागी झाले त्या साऱ्याच गायतोंडे यांच्या स्नेही, चाहते आणि आप्तजनांना तसेच हे सारे अत्यंत संवेदनशीलपणे लिखित स्वरुपात नोंदवून घेणाऱ्या शर्मिला फडके, माणिक वालावलकर आणि विशेषतः कमलेश देवरुखकर या लेखक मंडळीनाच आहे. मी फक्त हे सारे जमवून आणावयाचे काम केले इतकाच त्यातला माझा सहभाग आहे.
आता उदाहरणार्थच पहा, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या साऱ्याच घटना या ग्रंथात संकलीत झाल्या आहेत पण त्या करताना गायतोंडे यांची चित्रकलेची भूमिका, त्या मागचं त्याचं तत्वज्ञान, जगण्यातलं तत्वज्ञान, त्यांचा वैचारिक प्रवास, त्यांच्यावर असलेला इतरांचा प्रभाव, त्यांचं आयुष्याविषयीचं तत्वज्ञान, त्यांचे नानाविध अनुभव या सार्यांचच संकलन या ग्रंथात होणं अपेक्षित होतं, जे ' गायतोंडे ' समजावून घेण्यासाठी वाचकांना, त्यांच्या चाहत्यांना, चित्रकलेच्या विद्यार्थ्यांना आणि कलेच्या अभ्यासकांना उपयोगी ठरावं . सांगावयास आनंद वाटतो की ते सारे जमवून आणण्यात आम्ही बरेचसे यशस्वी देखील ठरलो आहोत. तसं नसतं तर मला देखील हा ग्रंथ कामाचा भाग असला तरी इतक्यांदा वाचवला नसता, हे मोकळेपणाने कबूल करावयास मला संकोच वाटत नाही. अर्थात याचे सारे श्रेय अर्थातच गायतोंडे यांनाच आहे. तसेच जे या ग्रंथाच्या लेखन प्रकियेत सहभागी झाले त्या साऱ्याच गायतोंडे यांच्या स्नेही, चाहते आणि आप्तजनांना तसेच हे सारे अत्यंत संवेदनशीलपणे लिखित स्वरुपात नोंदवून घेणाऱ्या शर्मिला फडके, माणिक वालावलकर आणि विशेषतः कमलेश देवरुखकर या लेखक मंडळीनाच आहे. मी फक्त हे सारे जमवून आणावयाचे काम केले इतकाच त्यातला माझा सहभाग आहे.
लिलावाच्या २३ कोटी ७० लाखाच्या बातमीप्रमाणे गायतोंडे यांच्या वरच्या या ग्रंथांनं देखील काही चकरावून टाकणारी बातमी दिली तर मला तरी काही त्याचे आश्चर्य वाटणार नाही, कारण तशी लक्षणं या ग्रंथाचा निर्माता म्हणून मला दिसू लागली आहेत हे नक्कीच . बाय द वे या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती नक्की प्रसिद्ध होते आहे हेही सांगून टाकतो ….
No comments:
Post a Comment