कसं असतं नाही ?
आपण एक ठरवत असतो, आणि घडत मात्र भलतंच काही तरी असतं,
आता उदाहरणार्थ हेच पहाना
'गायतोंडे ' यांच्या वरच्या ग्रंथाचं प्रकाशन दणक्यात करायचं म्हंणून ठरवलं
आणि कामाला लागलो, भेट प्रती कुणाला द्यायच्या , प्रकाशनाच्या वेळी कुणाकुणाला बोलवायचं, त्यावेळी भेट प्रती कुणाकुणाच्या हाती सोपवायाच्या, कुणाला पोस्टाने पाठवायच्या याची यादी करीत होतो, त्यात प्रफुल्लाबाईंचं नाव अर्थातच पहिल्या यादीत होतं, आता प्रफुल्लाबाई तर गेल्यात, वर्ष दीड वर्ष आधी शरद पाळंदे गेले, त्याच दरम्यान फिरोज रानडे गेले, त्या आधी ज्ञानेश्वर नाडकर्णी गेले, या साऱ्यांचेच गायतोंडे यांच्या वरचे लेख या ग्रंथात प्रसिद्ध होणार आहेत.
'गायतोंडे ' यांच्यावरच्या ग्रंथाचं प्रकाशन होत असताना ही सारी मंडळी तिथं
उपस्थित असावयास हवी होती असं खूप मनापासून वाटत होतं .
पण आपल्याला हव्या असलेल्या साऱ्या गोष्टी अशा आयुष्यात सरळपणे
का कधी मिळतात ?
काळ कधीच कुणासाठी थांबत नसतो. तो आपला दाणदाण चालतच राहतो, गायतोंडे यांच्या सारखा एखादाच प्रतिभावान त्याला पुरून उरतो, त्यावर आपलं नाव कोरून ठेवतो. २००१ साली आपल्यातून गेलेल्या 'गायतोंडे 'याचं एक पेंटिंग २०१४ साली तब्बल २३कोटी आणि ७० लाखाला विकलं जातं ते केवळ अपघाताने नव्हे, तो त्याच काळानं त्यांच्या कर्तृत्वाला ठोकलेला सलाम आहे, तर केवळ सुरवात आहे , तुम्ही आम्ही असू नसू, अशा बातम्या तर आता भविष्यात तर वरचेवर येतच राहणार आहेत. सांगायचे इतकेच होते की हे सारे 'चिन्ह " ने आधीच जाणले होते, म्हणूनच तर " चिन्ह " ने ते गेल्या बरोबर २००१ साली, मग २००६ आणि नंतर २००७ साली असे तीन विशेष अंक प्रकाशित केले होते. आता म्हणे गायतोंडे यांच्या वर एकदम ४-५ ग्रंथ येताहेत म्हणे. येवू द्यात , आपण नक्कीच त्याचं स्वागतच करू, पण आज आम्ही इतकंच सांगतो ' चिन्ह ' चं " गायतोंडे " मात्र या साऱ्यांच्याच आधी येतंय … आणिक एक सांगतो, आम्ही या ग्रंथासाठी काहीही करावयाचं बाकी ठेवलेलं नाही, हा ग्रंथ एकाच शब्दात सांगायचं तर " अदभूत " झालाय …… इति लेखन सीमा .
आपण एक ठरवत असतो, आणि घडत मात्र भलतंच काही तरी असतं,
आता उदाहरणार्थ हेच पहाना
'गायतोंडे ' यांच्या वरच्या ग्रंथाचं प्रकाशन दणक्यात करायचं म्हंणून ठरवलं
आणि कामाला लागलो, भेट प्रती कुणाला द्यायच्या , प्रकाशनाच्या वेळी कुणाकुणाला बोलवायचं, त्यावेळी भेट प्रती कुणाकुणाच्या हाती सोपवायाच्या, कुणाला पोस्टाने पाठवायच्या याची यादी करीत होतो, त्यात प्रफुल्लाबाईंचं नाव अर्थातच पहिल्या यादीत होतं, आता प्रफुल्लाबाई तर गेल्यात, वर्ष दीड वर्ष आधी शरद पाळंदे गेले, त्याच दरम्यान फिरोज रानडे गेले, त्या आधी ज्ञानेश्वर नाडकर्णी गेले, या साऱ्यांचेच गायतोंडे यांच्या वरचे लेख या ग्रंथात प्रसिद्ध होणार आहेत.
'गायतोंडे ' यांच्यावरच्या ग्रंथाचं प्रकाशन होत असताना ही सारी मंडळी तिथं
उपस्थित असावयास हवी होती असं खूप मनापासून वाटत होतं .
पण आपल्याला हव्या असलेल्या साऱ्या गोष्टी अशा आयुष्यात सरळपणे
का कधी मिळतात ?
काळ कधीच कुणासाठी थांबत नसतो. तो आपला दाणदाण चालतच राहतो, गायतोंडे यांच्या सारखा एखादाच प्रतिभावान त्याला पुरून उरतो, त्यावर आपलं नाव कोरून ठेवतो. २००१ साली आपल्यातून गेलेल्या 'गायतोंडे 'याचं एक पेंटिंग २०१४ साली तब्बल २३कोटी आणि ७० लाखाला विकलं जातं ते केवळ अपघाताने नव्हे, तो त्याच काळानं त्यांच्या कर्तृत्वाला ठोकलेला सलाम आहे, तर केवळ सुरवात आहे , तुम्ही आम्ही असू नसू, अशा बातम्या तर आता भविष्यात तर वरचेवर येतच राहणार आहेत. सांगायचे इतकेच होते की हे सारे 'चिन्ह " ने आधीच जाणले होते, म्हणूनच तर " चिन्ह " ने ते गेल्या बरोबर २००१ साली, मग २००६ आणि नंतर २००७ साली असे तीन विशेष अंक प्रकाशित केले होते. आता म्हणे गायतोंडे यांच्या वर एकदम ४-५ ग्रंथ येताहेत म्हणे. येवू द्यात , आपण नक्कीच त्याचं स्वागतच करू, पण आज आम्ही इतकंच सांगतो ' चिन्ह ' चं " गायतोंडे " मात्र या साऱ्यांच्याच आधी येतंय … आणिक एक सांगतो, आम्ही या ग्रंथासाठी काहीही करावयाचं बाकी ठेवलेलं नाही, हा ग्रंथ एकाच शब्दात सांगायचं तर " अदभूत " झालाय …… इति लेखन सीमा .
No comments:
Post a Comment