Saturday, October 26, 2013


महाराष्ट्र आंधळा आहे ?

कवी, लेखक, चित्रकार, समीक्षक, चित्रपट दिग्दर्शक अशा विविध रुपांनी ओळखल्या जाणार्‍या दिलीप चित्रे यांनी २००१ सालच्या ‘चिन्ह’च्या अंकाला एक छोटीशी मुलाखत दिली होती. त्यात ते म्हणतात...
‘‘ महाराष्ट्रातला सर्वोच्च चित्रकार गायतोंडे, त्याची दखल न घेणारा महाराष्ट्र आंधळा आहे. आठ कोटी मराठी भाषिकांना या कलावंताची माहिती नसणं, हा महाराष्ट्र संस्कृतीच्या आंधळेपणाचा पुरावा आहे. जगातल्या सर्व हयात श्रेष्ठ चित्रकारांत गायतोंडे मोडतात. असं म्हणायची साधी हिंमत कुणातही नाही. महाराष्ट्रात तर अजिबात नाही. (मुलाखतीच्यावेळी गायतोंडे हयात होते.) ज्या कलाकृती समजायला कठीण असतात अशा कृती समजायला, परंपरा समजण्याची ताकद लागते, ती महाराष्ट्रीयन लोकांच्यात नाही. मी १९५४ साली गायतोंडेंचं काम प्रथम पाहिलं, तेव्हापासून जागतिक कलेमधे भारतीय स्पिरीट असलेला एकमेव चित्रकार म्हणून गायतोंडे मला महत्त्वाचे वाटत आलेले आहेत. गायतोंडेंचा गूढवाद, आध्यात्मिक वाद हा संपूर्ण भारतीय, संपूर्ण मराठी वळणाचा आहे. (प्रसिद्धी पासून दूर) आपण जन्मभर अज्ञातवासात रहाणं, हे प्रसिद्धीच्या झोतात येण्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं माझं स्वत:चं मत आहे. टर्नर आणि आबालाल यांची तुलना करण्याचा उद्धटपणा महाराष्ट्रीयन का करीत नाहीत?

No comments:

Post a Comment