Saturday, October 26, 2013

गायतोंडे निष्ठूर का झाले?



गायतोंडेंना चित्रकार व्हायचं होतं 
आणि वडिलांना त्यांना डॉक्टर करायचं होतं.
गायतोंडे आपल्या भूमिकेवर ठाम होते आणि वडिलही त्यांच्या.
त्यातून गायतोंडेंच्या घरात भलामोठा संघर्ष उभा राहिला.
महिनोनमहिने बापलेकात संवाद होत नसे.
वडिल शिस्तीला एवढे कडक करडे की प्रसंगी
वयात आलेल्या मुलाला गुरासारखं मारायलाही कमी करत नसत.
इथून गायतोंडे घरापासून हळू हळू तुटत गेले.
1970 साली त्यांनी मुंबई सोडली आणि थेट दिल्ली गाठली.
घर त्याआधीच सुटलं होतं.
त्यानंतर त्या घरात त्यांनी पायही ठेवला नाही.
नाही म्हणायला वडिलांच्या मृत्यूच्या वेळी विधी करण्यासाठी
ते घरात जे काही आले असतील तेव्हढेच.

पण आईच्या निधनानंतर तर अंत्यविधीसाठी ते दिल्लीहून आलेही नाहीत.
एका प्रदर्शनाच्या वेळी धाकटी बहिण त्यांना भेटायला गेली
तर त्यांनी विचारलं का आलीस? येऊ नकोस?
"मला पुन्हा भेटायचा प्रयत्न केलात तर अमेरिकेला निघून जाईन...".
चित्रकार गायतोंडे यांचं हे लोकविलक्षण जगणं जसं जाणवलं, जसं भावलं, जसं हाती आलं तसं या ग्रंथात मांडलंय...

या खंडाविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.http://www.chinha.in/promo/gaitondebig.jpg

या ग्रंथातले काही लेख आमच्या chinha.in या संकेतस्थळावरही आहेत ते जरूर वाचा त्यासाठी http://www.chinha.in/marathi/archive2006.htmlया लिंकवर क्लिक करा.

No comments:

Post a Comment