चित्रकारांना खरी प्रसिद्धी मिळू लागते ती उतारवयातच .
म्हणजे जवळ जवळ साठीच्या आसपास .
( हुसेनसारखे चित्रकार त्याला अपवाद असू शकतात . कारण ते आपल्या
कामापेक्षा अन्य गोष्टीनीच लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधू शकतात .)
कामापेक्षा अन्य गोष्टीनीच लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधू शकतात .)
गायतोंडे यांचंदेखील तसंच झालं .
साठीच्या उंबरठ्यावर असताना गायतोंडे यांचा एक भीषण अपघात झाला .
या अपघातात ते वाचले खरे
पण नंतरच्या आयुष्यात त्यांना कायमचंच पंगुत्व आलं .
कल्पना करा अपघातामुळे धडपणानं उभं राहता येत नसेल
खाल्लेलं अन्न गिळता येत नसेल
खाता खाता , बोलता बोलता जीभ लोंबून बाहेर येत असेल
अशावेळी ज्याच्यावर हे बेतलं आहे त्याची काय अवस्था झाली असेल ?
पण गायतोंडे मात्र खचले नाहीत ….
त्या अपघातानंतर तब्बल आठ - नऊ वर्षाचा काळ
ते आपल्या स्टुडिओतल्या खुर्चीवर कोऱ्या कॅनव्हाससमोर बसून राहिले
फक्त विचार करीत , मनन करत , चिंतन करत .
आणि आठ - नऊ वर्षानं एके दिवशी उठून कामाला देखील लागले .
पेंटिंग करू लागले . त्यातलीच निवडक पेंटिंग या पोस्टमध्ये वापरली आहे .
याच काळात सुनील काळदातेनं त्यांच्यावरची फिल्म पूर्ण केली .
याच काळात प्रीतीश नंदी यांनी त्यांची ती गाजलेली मुलाखत घेतली .
त्यांचा हा साराच उफराटा प्रवास त्यांच्यावरच्या या ग्रंथात
अतिशय मनोज्ञपणे चित्रित झाला आहे .
जो भविष्यातील अनेक पिढ्यांना
स्फूर्तीदायक , प्रेरणादायक ठरू शकेल .
No comments:
Post a Comment